Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधान मोदींना राहुल गांधी यांचे आवाहन




नवी दिल्ली | अनेक मुद्द्यांवरून देशाच्या राजकारणात खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. त्यात सीमावादावरून भारत आणि चीनमध्ये तणाव असताना लडाख सीमेवरील पँगाँग सरोवरात चीन दुसरा पुल बांधत असल्याचं समोर आलं.
चीनी सेना दुसरा पुल बांधत असल्याची छायाचित्रे उपग्रहाद्वारे समोर आली. चीनचे उपद्व्याव थांबत नसताना काँग्रेस नेते राहुल गांधी  यांनी या मुद्द्यावरून थेट केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.
देशाच्या सुरक्षेशी आता तडजोड नको. पंतप्रधान मोदींनी आता देशाचं संरक्षण करावं, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे. तर काँग्रेसच्या इतर नेत्यांनी देखील केंद्र सरकारवर प्रहार केला आहे.

दरम्यान, भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडता यावर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. डरपोक आणि मवाळ उत्तर उपयोगाचे नाही. पंतप्रधानांनी देशाचे रक्षण करावे, असा सल्ला राहुल गांधींनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments