Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रासह चार राज्यात लाक डाऊन वाढणार? राज्यांना चिंता स्थलांतरितांची: पंतप्रधान मोदी यांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा जून-जुलै चिंताजनक

महाराष्ट्रासह चार राज्यात लाक डाऊन वाढणार?

राज्यांना चिंता स्थलांतरितांची: पंतप्रधान मोदी यांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा

जून-जुलै चिंताजनक

वैनगंगा न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: देशभरात लागू असलेली संचार बंदी वाढविण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्रासह पंजाब, बिहार व पश्चिम बंगाल ने केली. तामिळनाडू ने रेल्वे व विमानसेवा 31 मे पर्यंत सुरू करू नये असे म्हटले आहे. आंध्र प्रदेशाने आधीच 31 मेपर्यंत संचारबंदी वाढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ही मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर संचारबंदी मधून 17 मे पर्यंत कसे बाहेर पडायचे यासाठीची योजना तयार करण्याचे मोठे आव्हान केंद्र व राज्य सरकारांपुढे आहे.

Post a Comment

0 Comments