Ticker

6/recent/ticker-posts

विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण, महावितरणने लक्ष देण्याची गरज

 

प्रतिनिधी
जुनगाव आणि देवाळा परिसरात विजेचा पुरवठा वारंवार खंडित होण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत .दिवस रात्र कितीदा लाईट जाते याचा हिशोब कोणीही सांगू शकत नाही. पाच मिनिटात ,दहा मिनिटात लाईट गायब होते. त्यामुळे सामान्य तसेच सर्वच नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून पंख्याशिवाय नागरिक राहूच शकत नाहीत अशी परिस्थिती असताना महावितरण मात्र कमालीचे दुर्लक्ष करताना दिसत आहे.
वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी सर्व नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments