Ticker

6/recent/ticker-posts

मातंग समाज अन्याय निवारण समिती व लहुजी बिग्रेडचा भव्य मोर्चा ======================= समितीचे राज्यसमनव्यक डॉ. अंकुश गोतावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे आयोजन ====================== ( सय्यद शब्बीर जागीरदार )



======================
( सय्यद शब्बीर जागीरदार )

जिवती  :- राज्यात मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय -अत्याचाराच्या विरोधात व संविधानाचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिवतीतील मातंग समाज अन्याय निवारण समिती व लहुजी बिग्रेड च्या वतीने भव्य निषेध मोर्चाचे शक्तिप्रदर्शन करीत समितीचे राज्यसमनव्यक मा. डॉ. अंकुश गोतावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या मुख्य मागण्यां स्व. डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या ही प्रमुख मागणी व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भारताचे संविधान जुने झाले असून आता नव्या संविधानाची गरज आहे व ते लिहणे सुरू आहे असे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या पुतळ्याचे दहन केले, त्यानंतर अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. जिवतीतील बसस्थानक परिसरातील  मैदानावरून निघालेल्या भव्य निषेध मोर्चाचे नेतृत्व प्रा.सुग्रीव गोतावळे, मा. उपसभापती प.स. जिवती, देविदास कांबळे, भानुदास जाधव, व्यंकटी तोगरे, आनंद पवार, आनंद हरगिले, माधव तोगरे, पंढरी वाघमारे यांनी केले. तत्पूर्वी तालुक्यातील संपूर्ण कानाकोपऱ्यातुन शेकडो वाहनांनी सकाळपासूनच मातंग बांधवांनी मैदानावर गर्दी केली होती. ‘जय लहुजी’ लिहिलेले दुपट्टे, लाल रंगाचे ध्वज हातात घेऊन निघालेला मोर्चा बसस्थानक ते तहसील कार्यालयावर धडकला व नंतर त्याठिकाणी विशेष सभा घेऊन त्या सभेला अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले,मोर्चाच्या शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात जाऊन शिष्टमंडळाच्या हस्ते तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  याप्रसंगी या मोर्चात तालुक्यातील मोठ्या संख्येने मातंग समाजबांधव उपस्थित होता.


Post a Comment

0 Comments